Monday, January 26, 2026

Indian Family System 2030




💐 Happy 5th Wedding Anniversary, Dear Harshvardhan & Priyanka! 💐

You both are the strong roots of our family tree, spreading love, values, and happiness.

God bless you always ❤️🌿


🌳 नात्यांबद्दल माझा विचार



माझ्या मते आयुष्य हे एका झाडासारखे आहे.


मूळ माणसं (Roots) म्हणजे आपले खरे जवळचे —

आपले कुटुंब, जे आपल्याला आतून मजबूत ठेवते.


फांदी आणि पानांची माणसं (Branches & Leaves) म्हणजे आपल्या प्रवासात जोडली गेलेली —

आपले मित्र, सोबती आणि आधार देणारे.


आणि मला असे वाटते…


जर तुमच्या आयुष्यात फक्त ५ लोक असे असतील

ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने कुटुंब मानू शकता,

आणि १० मित्र असे असतील

ज्यांच्यावर तुम्ही कठीण प्रसंगी पूर्ण विश्वास ठेवू शकता,

तर तुम्ही खरोखरच या जगातील सर्वात धन्य व्यक्ती आहात.



My post published on 12/02/2018 09:06

भारतीय कुटुंब व्यवस्था २०३०

Happy Family Index



रोटरी  क्लब ऑफ  पुणे गांधीभवन यांनी आयोजित केलेल्या  Oratorian 2018 स्पर्धेत  भारतीय कुटुंब व्यवस्था २०३० (Indian Family System 2030)  ह्या विषयावर  १० मिनिटात  माझ्या मनात  घोळत असलेले विचार लोकांपर्येन्त पोहचविण्याची संधी मिळाली आणि मी त्यात यशस्वि हि झालो कारण तिन्ही परीक्षकांनी (वंदना बोकील-कुलकर्णी,उमेश आगाशे आणि तुषार सोनजे Vandana Bokil-Kulkarni, Umesh Agashe and Tushar Sonjeह्या तिघांनी  त्यांच्या भाषणामध्ये मी मांडलेल्या  मुद्द्यांचा उल्लेख  केला. श्रोत्यांमधील  एक श्रोता म्हणाला "भाषण उत्तम झाले  आता बोलले त्या प्रमाणे पुढे कृतीही करा ." तेव्हा आपण पुण्यात आहोत  ह्याची जाणीव झाली आणि  त्याच बरोबर भावना पोहोचल्याची पावतीपण मिळाली. 

   






Our Rotary club of Pune Shivajinagar Team






नमस्कार  व्यासपीठावरील मान्यवर  आणि कुटूंब वत्सल  श्रोतेगण 

आजचा  माझा विषय  2030 मधील भारतीय कुटुंब व्यवस्था हा आहे 


कुटुंब व्यवस्था जगात सगळीकडे आहे. परंतु भारतात ती खूप खंबीर आहे अशी जगभरात मान्यता आहे  . आणि २०३० मध्ये ती आणखी खंबीर होण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न आतापासून करावयास हवे.  नाहीतर एके काळी  भारतातील कुटुंब व्ययस्था खूप खंबीर होती असा इतिहास २०5० नंतर सांगितला  जाईल.  


तुम्ही म्हणाल असा विचार मनात का आला ?


तर ह्याचे उत्तर संध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि संयोजकांनी स्पर्धेसाठी  निवडलेला  हा विषय 

हेच आहे  .  कारण आगी शिवाय धूर नसतो … काहीतरी उलथापालथ सामाजिक स्तरावर वैचारिक स्तरावर नक्कीच घडत आहे… किंबहुना ती सतत घडत असते . परिवर्तन  बदल हीच एक स्थिर गोस्ट आहे. Change is the only constant.



तर आधी आपण सद्य परिस्तितीत काय घडत आहे ह्याचा आढावा घेऊ 


१. बुद्दिजीवी तरुणाई म्हणते लग्न हि संकल्पना मोडीत निघत आहे. Live in relationship is a new trend. आता असे विचार तर २०३० मध्ये काय?


BTW Live in relationship ला मराठीत काय म्हणतात हे मी गुगल करून शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही.  गंधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह . जो दुष्यन्त शकुंतला ह्यांनी  केला होता आणि त्यांच्या प्रेमाचे फळ त्यांचा पुत्र भरत ज्यामुळे आपल्या  देशाचे नाव भारत असे पडले. 

  

२. छोट्या छोट्या कारणावरून  घटस्फोटाचे वाढते प्रमाण 


३. दिवसेन दिवस  एकत्र कुटुंब पद्धतीचा होणार ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धती मध्ये होणारी वृद्धी आणि त्याला घटस्फोटाचा बागुलबुवा  


४. नौकरी निमित्त परदेशी गेलेली मुले आणि त्यांचे कुटुंब  आणि वर्षभरातात परदेश आणि भारत वाऱ्या करणारे रिटायर्ड आई वडील आणि त्यांचे भारतातील कुटुंब 


५. आणि दुष्काळात तेरावा महिना  म्हणावा कि काय नुकताच  आलेला अहवाल सांगतो  तरुण मुलींचे गुणोत्तर प्रमाण  २०२१ मध्ये ९०४ आणि २०३१ मध्ये ८९८  असेल असा अंदाज आहे. 


ह्या सर्व पार्श्वभूमीवर २०३० मधील भारतीय कुटुंब व्यवस्था कशी असेल. ? 


आपण  देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास  हवे आणि २०३० मधे त्याचा वापर करायची तयारी आतापासूनच करावयास हवी 


आणि त्यासाठी टेकनॉलॉजि चा उपयोग करता येऊ शकतो 

तुम्ही म्हणाल काहीतरीच काय टेक्नॉलॉजी काय करणार 

तर नुकताच  टेक्नॉलॉजी  मुले समाजात घडलेला एक बदल नमूद करू इच्छितो  


उबेर/ओला  ह्या मुळे झालेला बदल लक्षात घ्या 

सर्विस देणारे म्हणजे ड्राइवर आणि सर्विस घेणारे म्हणजे प्रवासी दोघांनाही शिस्त लावण्याचे काम टेक्नॉलॉजी ने केले आहे हा खरोखरीच विचार करण्याचा मुद्दा आहे. 

दोघं पैकी फक्त एकाला डोक्यावर बसविण्या पेक्षा दोघांकडूनही विश्वास आणि उत्तम सेवा ह्या मुल्ल्यांना  अधिक अधिकार आणि महत्व देण्यात आले आहेत. आणि लक्षात ठेवा भविष्यात हेच होणार आहे  विश्वास आणि उत्तम सेवा देणाऱ्या आणि  मूल्य निर्माण करणाऱ्या पद्धतीचं टिकणार आहेत. 


मग ती विवाह संस्था असो 

शिक्षण संस्था असो 

सहकारी संस्था असो 

कंपनी किंवा सर्विस कंपनी असो 

वा  पॉलिटल पार्टी असो 


उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.

सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.

माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. 


प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.

भारतीय समाजातील कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात


१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.

सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय. 

पण घटस्फोट झाला तरी पती पत्नी चे नाते मित्रत्वाचे असावयास काय हरकत आहे. 

पण जेव्हा लग्न हे फक्त प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन केले जाते आणि घटस्फोट हि भविष्यातील योजना  असते  तेव्हा लग्न हे पवित्र बंधनाच्या सीमा तोडून एक फक्त व्यवहार मात्र होऊन जाते . 

ह्या प्रकारावर  वेळेतच अंकुश घालण्याची गरज आहे.  



२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती


सद्य परिस्थिती: दोघांनी आपापली क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी किंवा वाटून घ्यावी आणि एकमेकांना  योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.



३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.


सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.


कुटुंब हि प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते  आणि  आई हि पहिली शिक्षिका 



४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.


सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.



तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.

तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.

परदेशी  राहून आलेल्या लोकांना घरकामासाठी कामगार वर्ग मिळणे हि आपल्या देशात केवढी मोठी उपलब्धी आहे ह्याची नक्कीच जाणीव असेल. पण बाई आणि मलिकनबाई ह्या दोघांनीही काळाची गरज ओळखून विश्वास आणि ऊत्तम सेवा दोन्ही बाजूंनी वाढवून मूल्य निर्मिती करण्याची  गरज आहे नाहीतर हा पण इतिहास व्हायला वेळ लागणार नाही.

गावाकडे शेती साठी मजूर मिळणे दिवसेन दिवस कठीण होत चालले आहे. त्यावरही विचार करावयास हवा . त्यामुळे  शेतीसाठी  नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतावर नवीन जीवन शैलीचा आनंद घेणारी जास्तीत जास्त सुखी कुटुंबे २०३० मध्ये निर्माण होतील असा माझा विश्वास आहे.  तसे झाले तर गावांचा विकास होईल आणि शहरांकडे येणार ओघ थांबेल. 


तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.

तुमच्याच सुखात भर पडेल. थोडक्यात २०३० मधील कुटुंब व्यवस्था वसुधैव कुटुम्बकम् च्या दिशेने वाटचाल करणारी असेल असा माझा विश्वास आहे. आणि तरुणाई नक्कीच त्या दिशेने वाटचाल करेल . गरज आहे त्यांना समजावून घेऊन जुन्या नियमातील नि काढून यमाचे म्हणजे मूल्यांचे मूल्य नवीन पिढीच्या नवीन विचारांच्या नियमात बसवून मान्य करण्याची. नियम हे कालानुरूप बदलत असतात पण त्यातील मूल्य म्हणजे यम हे त्रिकालाबाधित सत्य असते. 








❤️ In a world moving fast, dinner together is still the most beautiful tradition.
🌳 Roots grow stronger when families sit together and listen to each other.



🇮🇳 Indian families don’t just share food… they share stories, values, and love.


Wednesday, January 14, 2026

MuktAI

 


MuktAI – Where AI Means Awareness Intelligence 

At MuktAI, AI does not stand only for Artificial Intelligence.
For us, AI primarily means Awareness Intelligence.

Artificial Intelligence is a powerful tool—important, useful, and very much the need of the hour.
But tools keep changing.
What truly lasts and empowers human life is Awareness Intelligence.

आमचा उद्देश म्हणजे डिजिटल तफावत कमी करणे, म्हणजे शहरांमध्ये सहज उपलब्ध असलेले आधुनिक व जागतिक दर्जाचे IT ज्ञान प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना आणि लहान उद्योजकांना थेट पोहोचवणे.

खूप जणांना भीती वाटते की AI मुळे नोकऱ्या कमी होतील, पण खरं म्हणजे धोका AI मध्ये नाही तर त्याचे कौशल्य शिकण्याच्या संधीच्या कमतरतेत आहे.
भविष्यात नोकऱ्या संपणार नाहीत, तर त्या मिळतील त्या लोकांना जे नवीनतम AI ज्ञान आत्मसात करतील.


For more details visit

MuktAI.in

My Posts
My Videos
My Profile


Thursday, December 25, 2025

AI Session at Schools in Jalgaon and Muktainagar

 

A Special AI Session at My Own School –
J.E. School, Muktainagar

The AI session conducted yesterday, 24-12-2025, at J.E. School, Muktainagar, was truly special and close to my heart.

Interacting with my own students in my own school brought a unique sense of joy, responsibility, and fulfillment. The session turned out to be highly interactive, as students began connecting AI with their studies, creativity, and future career possibilities. Their confidence and curiosity were clearly visible throughout the discussion.

Revisiting and sharing some of the important milestones from my own journey, which began in this very school, was an emotional experience. Presenting those moments to students with the hope that they may inspire and guide them made the session even more meaningful.

During the practical session, Priyanka Chaudhary explained and shared several useful and hands-on AI prompts with the students, helping them understand how AI can be applied effectively in real learning scenarios.

I sincerely thank Headmaster Mr. V. M. Chaudhary Sir, Mr. Rane Sir, and the school management for their wholehearted support and encouragement in making this initiative successful.

Adding a beautiful touch to this journey, ChatGPT spontaneously wrote a poem reflecting my experiences, making the moment unexpectedly memorable. I am truly grateful to ChatGPT for this creative and thoughtful gesture.

This experience once again proved that when we communicate with AI sincerely and meaningfully, it can become more than just a tool—it can truly feel like a

friend.











My Training Session at Jalgaon Schools

We started our first AI session at Maharana Pratap Vidyalaya,Jalgaon on 15-12-2025 , after that we successfully conducted three more AI training sessions at St. Teresa’s Convent School , Imperial International School and Bhagirath school, Jalgaon.

Our sincere thanks to Ms. Meenakshi Jain, Executive President – SDSEED,
and Dr. Prasannakumar Redasani, Governing Board Chairman – SDSEED,
for giving us this valuable opportunity and continuous encouragement. Our heartfelt thanks to SD-SEED mentor Shri. Nilkanth Gayakwad Sir for attending all sessions and offering invaluable guidance

The session focused on empowering students with practical AI tools to enhance learningbuild confidence, and develop future-ready skills. The enthusiastic participation and positive response from students and teachers made the session truly impactful.
📰 The workshop was also featured in the local newspaper, highlighting its relevance and positive impact.

An inspiring step towards preparing students for an **AI-driven future**! 🚀📘



Saturday, November 8, 2025

Who Am I?

 🌼 मी कोण? आत्मपरीक्षण – एक चिंतन

Who Am I? – Self-Reflection and Inner Awakening

(Original Writing – 1992 | Rewritten for sanjeevchaudhary.com & MuktAI, 2025)

🌱 प्रस्तावना
आपण सगळेच आनंदी, शांत आणि सुखी जीवन जगायची इच्छा ठेवतो. 

पण फक्त इच्छा असून काही होत नाही — प्रयत्न, दिशादर्शन आणि 

आत्मनियोजन यांची जोड मिळाली तरच सुखाचं जीवन शक्य होतं.



Introduction
Every one of us desires a happy, peaceful, 

and fulfilling life. But desire alone is not enough — 

only when effort, direction, and inner discipline unite, 

does true happiness emerge.



Hindi:
हम सब एक सुखी, शांत और संतुलित जीवन जीना चाहते हैं।
लेकिन सिर्फ इच्छा रखने से कुछ नहीं होता —
जब प्रयास, दिशा और आत्मअनुशासन एक साथ आते हैं,
तभी जीवन सच्चे सुख का रूप लेता है।


🔍 श्रद्धा आणि आत्मपरीक्षण
आपल्यातली श्रद्धा आणि विश्वास हाच आपला खरा देव आहे. 

श्रद्धा म्हणजे अंतिम सत्यावरचा विश्वास, आणि विश्वास म्हणजे स्वतःवरचा.

आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःशी संवाद —

 शब्दांत नव्हे, तर हृदयातून. तो अनुभव आणि ती जाणीव  हेच खरे ज्ञान.



Faith and Self-Reflection
The real divinity lives within us — as faith and trust. 

Faith is belief in the ultimate truth; trust is belief in oneself. 

Self-reflection is an intimate dialogue with your own inner being — 

not through words, but through awareness. 

That silent awareness is the beginning of wisdom.


Hindi:


हमारे भीतर की श्रद्धा और विश्वास ही हमारा असली ईश्वर हैं।
श्रद्धा का अर्थ है – परम सत्य पर भरोसा, और
विश्वास का अर्थ है – स्वयं पर भरोसा।
आत्मपरीक्षण का मतलब है अपने आप से 
संवाद करना —
शब्दों से नहीं,
बल्कि हृदय की शांति से।
वह अनुभव और वहजागरूकता ही सच्चा ज्ञान है।

💫 भाग्य आणि अस्वस्थता
आपण किती भाग्यवान आहोत हे जाणून घ्या — 

या जन्मात आपल्याला भारतभूमी लाभली आहे. 

परंतु स्वातंत्र्य असूनही मनात अस्वस्थता का? 

कदाचित आपण आपल्या अंतर्मनातील परमेश्वराशी संपर्क हरवला आहे.


Fortune and Restlessness
We are truly blessed to be born on this sacred land. 

Yet, even in freedom, the mind feels restless. 

Perhaps we have lost touch with the divine within — 

the quiet consciousness that guides us.


Hindi:
हम कितने भाग्यशाली हैं कि हमें भारतभूमि पर जन्म मिला है।
फिर भी स्वतंत्रता के बावजूद मन में बेचैनी क्यों है?
शायद हमने अपने भीतर के परमात्मा से संपर्क खो दिया है।



🕊️ परीक्षण आणि विवेक
“जे सांगितलं गेलं त्यावर अंधविश्वास ठेवू नका. 

जे गुरु सांगतील ते फक्त श्रद्धेने ग्रहण करू नका. 

स्वतः विचार करा, परीक्षण करा, आणि

जे सत्य वाटेल त्यावरच विश्वास ठेवा.”



Inquiry and Discernment
“Do not blindly believe what has been told. 

Do not accept a teacher’s words merely out of reverence. 

Think deeply, test everything, and 

trust only what feels truly right to your soul.”


Hindi:
“जो कहा गया है, उस पर अंधविश्वास मत करो।
जो गुरु कहते हैं, उसे सिर्फ श्रद्धा के कारण मत स्वीकारो।
स्वयं विचार करो, परखो, और जो सत्य तुम्हारे मन

को सही लगे,
उसी पर विश्वास करो।”
अनुभव पर आधारित श्रद्धा, अंधविश्वास से कहीं श्रेष्ठ है —
क्योंकि अनुभव ही भीतर के प्रकाश का जन्म देता है।




🌸 बदलाचा क्षण
तुमच्या आयुष्यातील एक क्षण तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतो. 

तो क्षण म्हणजेच जागृतीचा क्षण — जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो 

आणि स्वतःकडूनच स्वतःचा शोध घेतो.



The Moment of Transformation
There comes a single moment in life that transforms everything — 

a moment of awakening when you finally see who you truly are, 

and your search turns inward



Hindi:
जीवन में एक ऐसा क्षण आता है जो सब कुछ बदल देता है।
वही क्षण जागृति का होता है —
जब मनुष्य स्वयं को पहचानता है और
अपने भीतर अपने ही स्वरूप की खोज करता है।



✨ सत्याचं नव्याने दर्शन
सत्य कधीच बदलत नाही, फक्त आपल्या समजुती बदलतात. 

गीतेत सांगितलेलं सत्य आजही तितकंच लागू आहे. 

विचारांचा प्रवाह ज्या दिशेने, तशीच जीवनाची वाट ठरते. 

म्हणूनच दुःख आणि समाधान हे दोन्ही आपल्या विचारांमधून निर्माण होतात.



Rediscovering Truth
Truth never changes — only our understanding of it evolves. 

The wisdom of the Gita still breathes in every age. 

As your thoughts flow, so flows your life. 

Joy and sorrow are born from the same stream — 

the stream of your own mind.


Hindi:
सत्य कभी बदलता नहीं — सिर्फ हमारी समझ बदलती है।
गीता में जो सत्य बताया गया था, वह आज भी उतना ही प्रासंगिक है।
विचार जिस दिशा में बहते हैं, जीवन उसी दिशा में चलता है।
इसीलिए दुःख और सुख, दोनों हमारे विचारों से ही जन्म लेते हैं।



🌼 निष्कर्ष
“मी कोण?” हा प्रश्न माणसाला अंतर्मुख करतो, अहंकार मोडतो 

आणि आत्मज्ञानाचं द्वार उघडतो. श्रद्धा आणि विवेक यांच्या संगमातूनच 

सुख, शांतता आणि समाधान निर्माण होतं.



Conclusion
The question “Who am I?” dissolves the ego and 

opens the doorway to self-knowledge. 

True peace, joy, and balance arise only where faith meets wisdom — 

and where thought meets silence.


Hindi:
“मैं कौन हूँ?” यह प्रश्न मनुष्य को अंतर्मुख करता है,
अहंकार को तोड़ता है
और आत्मज्ञान का द्वार खोलता है।
श्रद्धा और
विवेक के संगम से ही सच्चा सुख, शांति और संतोष जन्म लेते हैं।

✍️ लेखक: संजीव चौधरी | Original Writing: 1992 | Rewritten for sanjeevchaudhary.com & MuktAI (2025)