💐 Happy 5th Wedding Anniversary, Dear Harshvardhan & Priyanka! 💐
You both are the strong roots of our family tree, spreading love, values, and happiness.
God bless you always ❤️🌿
🌳 नात्यांबद्दल माझा विचार
माझ्या मते आयुष्य हे एका झाडासारखे आहे.
मूळ माणसं (Roots) म्हणजे आपले खरे जवळचे —
आपले कुटुंब, जे आपल्याला आतून मजबूत ठेवते.
फांदी आणि पानांची माणसं (Branches & Leaves) म्हणजे आपल्या प्रवासात जोडली गेलेली —
आपले मित्र, सोबती आणि आधार देणारे.
आणि मला असे वाटते…
जर तुमच्या आयुष्यात फक्त ५ लोक असे असतील
ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने कुटुंब मानू शकता,
आणि १० मित्र असे असतील
ज्यांच्यावर तुम्ही कठीण प्रसंगी पूर्ण विश्वास ठेवू शकता,
तर तुम्ही खरोखरच या जगातील सर्वात धन्य व्यक्ती आहात.
My post published on 12/02/2018 09:06
भारतीय कुटुंब व्यवस्था २०३०
नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि कुटूंब वत्सल श्रोतेगण
आजचा माझा विषय 2030 मधील भारतीय कुटुंब व्यवस्था हा आहे
कुटुंब व्यवस्था जगात सगळीकडे आहे. परंतु भारतात ती खूप खंबीर आहे अशी जगभरात मान्यता आहे . आणि २०३० मध्ये ती आणखी खंबीर होण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न आतापासून करावयास हवे. नाहीतर एके काळी भारतातील कुटुंब व्ययस्था खूप खंबीर होती असा इतिहास २०5० नंतर सांगितला जाईल.
तुम्ही म्हणाल असा विचार मनात का आला ?
तर ह्याचे उत्तर संध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि संयोजकांनी स्पर्धेसाठी निवडलेला हा विषय
हेच आहे . कारण आगी शिवाय धूर नसतो … काहीतरी उलथापालथ सामाजिक स्तरावर वैचारिक स्तरावर नक्कीच घडत आहे… किंबहुना ती सतत घडत असते . परिवर्तन बदल हीच एक स्थिर गोस्ट आहे. Change is the only constant.
तर आधी आपण सद्य परिस्तितीत काय घडत आहे ह्याचा आढावा घेऊ
१. बुद्दिजीवी तरुणाई म्हणते लग्न हि संकल्पना मोडीत निघत आहे. Live in relationship is a new trend. आता असे विचार तर २०३० मध्ये काय?
BTW Live in relationship ला मराठीत काय म्हणतात हे मी गुगल करून शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही. गंधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह . जो दुष्यन्त शकुंतला ह्यांनी केला होता आणि त्यांच्या प्रेमाचे फळ त्यांचा पुत्र भरत ज्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत असे पडले.
२. छोट्या छोट्या कारणावरून घटस्फोटाचे वाढते प्रमाण
३. दिवसेन दिवस एकत्र कुटुंब पद्धतीचा होणार ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धती मध्ये होणारी वृद्धी आणि त्याला घटस्फोटाचा बागुलबुवा
४. नौकरी निमित्त परदेशी गेलेली मुले आणि त्यांचे कुटुंब आणि वर्षभरातात परदेश आणि भारत वाऱ्या करणारे रिटायर्ड आई वडील आणि त्यांचे भारतातील कुटुंब
५. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणावा कि काय नुकताच आलेला अहवाल सांगतो तरुण मुलींचे गुणोत्तर प्रमाण २०२१ मध्ये ९०४ आणि २०३१ मध्ये ८९८ असेल असा अंदाज आहे.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर २०३० मधील भारतीय कुटुंब व्यवस्था कशी असेल. ?
आपण देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास हवे आणि २०३० मधे त्याचा वापर करायची तयारी आतापासूनच करावयास हवी
आणि त्यासाठी टेकनॉलॉजि चा उपयोग करता येऊ शकतो
तुम्ही म्हणाल काहीतरीच काय टेक्नॉलॉजी काय करणार
तर नुकताच टेक्नॉलॉजी मुले समाजात घडलेला एक बदल नमूद करू इच्छितो
उबेर/ओला ह्या मुळे झालेला बदल लक्षात घ्या
सर्विस देणारे म्हणजे ड्राइवर आणि सर्विस घेणारे म्हणजे प्रवासी दोघांनाही शिस्त लावण्याचे काम टेक्नॉलॉजी ने केले आहे हा खरोखरीच विचार करण्याचा मुद्दा आहे.
दोघं पैकी फक्त एकाला डोक्यावर बसविण्या पेक्षा दोघांकडूनही विश्वास आणि उत्तम सेवा ह्या मुल्ल्यांना अधिक अधिकार आणि महत्व देण्यात आले आहेत. आणि लक्षात ठेवा भविष्यात हेच होणार आहे विश्वास आणि उत्तम सेवा देणाऱ्या आणि मूल्य निर्माण करणाऱ्या पद्धतीचं टिकणार आहेत.
मग ती विवाह संस्था असो
शिक्षण संस्था असो
सहकारी संस्था असो
कंपनी किंवा सर्विस कंपनी असो
वा पॉलिटल पार्टी असो
उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.
सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.
माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे.
प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.
भारतीय समाजातील कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात
१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.
सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय.
पण घटस्फोट झाला तरी पती पत्नी चे नाते मित्रत्वाचे असावयास काय हरकत आहे.
पण जेव्हा लग्न हे फक्त प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन केले जाते आणि घटस्फोट हि भविष्यातील योजना असते तेव्हा लग्न हे पवित्र बंधनाच्या सीमा तोडून एक फक्त व्यवहार मात्र होऊन जाते .
ह्या प्रकारावर वेळेतच अंकुश घालण्याची गरज आहे.
२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती
सद्य परिस्थिती: दोघांनी आपापली क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी किंवा वाटून घ्यावी आणि एकमेकांना योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.
३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.
सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.
कुटुंब हि प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते आणि आई हि पहिली शिक्षिका
४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.
सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.
तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.
तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.
परदेशी राहून आलेल्या लोकांना घरकामासाठी कामगार वर्ग मिळणे हि आपल्या देशात केवढी मोठी उपलब्धी आहे ह्याची नक्कीच जाणीव असेल. पण बाई आणि मलिकनबाई ह्या दोघांनीही काळाची गरज ओळखून विश्वास आणि ऊत्तम सेवा दोन्ही बाजूंनी वाढवून मूल्य निर्मिती करण्याची गरज आहे नाहीतर हा पण इतिहास व्हायला वेळ लागणार नाही.
गावाकडे शेती साठी मजूर मिळणे दिवसेन दिवस कठीण होत चालले आहे. त्यावरही विचार करावयास हवा . त्यामुळे शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतावर नवीन जीवन शैलीचा आनंद घेणारी जास्तीत जास्त सुखी कुटुंबे २०३० मध्ये निर्माण होतील असा माझा विश्वास आहे. तसे झाले तर गावांचा विकास होईल आणि शहरांकडे येणार ओघ थांबेल.
तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.
तुमच्याच सुखात भर पडेल. थोडक्यात २०३० मधील कुटुंब व्यवस्था वसुधैव कुटुम्बकम् च्या दिशेने वाटचाल करणारी असेल असा माझा विश्वास आहे. आणि तरुणाई नक्कीच त्या दिशेने वाटचाल करेल . गरज आहे त्यांना समजावून घेऊन जुन्या नियमातील नि काढून यमाचे म्हणजे मूल्यांचे मूल्य नवीन पिढीच्या नवीन विचारांच्या नियमात बसवून मान्य करण्याची. नियम हे कालानुरूप बदलत असतात पण त्यातील मूल्य म्हणजे यम हे त्रिकालाबाधित सत्य असते.









.jpeg)


.jpeg)



.jpeg)
.jpeg)
.jpeg)